तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे- संरक्षण तज्ज्ञ एस. आर. सिन्हो

जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 17 जवानांना वीरमरण आलं.. तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद असल्याचं डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी म्हटलंय. 

Updated: Sep 18, 2016, 08:46 PM IST
तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे- संरक्षण तज्ज्ञ एस. आर. सिन्हो title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 17 जवानांना वीरमरण आलं.. तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद असल्याचं डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी म्हटलंय. 

पाकिस्तानने भारताविरोधात हे एक युद्धच पुकारलं आहे. त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची वेळ आलीय असं मत संरक्षण तज्ज्ञ एस. आर. सिन्हो यांनी व्यक्त केलंय.