कोळ्यांची मासेमारी, `बाप्पां`ची सागरवारी!

कोळी बांधव आपल्या बोटीवरच गणेशोत्सव साजरा करतात. आणि मग या मच्छिमारांबरोबरच बाप्प्पाचा समुद्र प्रवास सुरु होतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 5, 2013, 09:24 PM IST

www.24Taas. झी मीडिया, सिंधुदुर्ग
गणेशोत्सवाची लगबग सगळीकडेच सुरु असतानाच कोकणातल्या कोळी बांधवांचे गणपती बाप्पा मात्र समुद्र सफरीवर निघालेत. कोळी म्हणजेच मच्छीमार बांधवांचा उदरनिर्वाह मासेमारीवारच असल्याने अनेक कोळी बांधव आपल्या बोटीवरच गणेशोत्सव साजरा करतात. आणि मग या मच्छिमारांबरोबरच बाप्प्पाचा समुद्र प्रवास सुरु होतो.
कोकणामध्ये घरगुती गणेशोत्सवाला विशेष महत्व असल्याने चाकरमान्यांची गडबड सुरु असलेली सर्वत्रच पहायला मिळते. घरोघरी गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना कोकणातल्या कोळीवाड्यातील गणपती मात्र समुद्र सफरीवर निघालेत. मासेमारी हे एकमेव उत्पनाचे साधन असल्याने घरी राहून गणेशोत्सव साजरा करणे कोळी बांधवाना शक्य नसते. त्यामुळे अनेक कोळी बांधव गणेशोत्सव या बोटीन वरच साजरा करतात. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्या नंतर मग बाप्पांचा समुद्र प्रवास सुरु होतो.
कोळी बांधव गणपती बाप्पाला वाजत गाजत किना-यावर आणतात आणि मग बाप्पाची प्रतिष्ठापना पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर बोटीवरचे पुरुष मंडळी बाप्पाला सोबत घेऊनच मासेमारीसाठी रवाना होतात. समुद्रात असताना हा गणपती बाप्पाच आपले रक्षण करतो अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे. समुद्र सफारीवर निघालेले हे सर्व बाप्पा मच्छीमार बांधवांचे रक्षण करतील अशीच प्रार्थना आपण करुया

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.