मोबाईलला हात लावला म्हणून १० वर्षाच्या मुलाची हत्या

मोबाईलला हात लावला म्हणून एका साधूनं १० वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधील वैजापूरमध्ये घडलीय. या घटनेनंतर संतप्त गावक-यांनी या साधूला बेदम मारलं आणि त्यात त्या साधूचाही मृत्यू झाला.. 

Updated: Dec 20, 2015, 09:26 AM IST
मोबाईलला हात लावला म्हणून १० वर्षाच्या मुलाची हत्या title=

वैजापूर : मोबाईलला हात लावला म्हणून एका साधूनं १० वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधील वैजापूरमध्ये घडलीय. या घटनेनंतर संतप्त गावक-यांनी या साधूला बेदम मारलं आणि त्यात त्या साधूचाही मृत्यू झाला.. 

शनिवारी रात्री वैजापूरातील दहेगावच्या याच खोलीत विश्वानंद सरस्वती या साधूनं महेश उगले या १० वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केली. खेळता खेळता महेशनं या साधु महाराजांच्या मोबाईलला हात लावला. आपल्या मोबाईलला हात लावल्याचा या साधूला इतका राग आला की त्यानं या चिमुकल्याच्या डोक्यावर कु-हाडीचा घाव केला. यात महेश जागीच ठार झाला. 

मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या नातेवाईकांनी साधुंच्या झोपडीकडे धाव घेतली. झोपडीतलं दृश्य पाहून नेतेवाईक आणि ग्रामस्थांनाही राग अनावर झाला आणि त्यांनी या साधूला झोपडीच ठेचून ठेचून मारलं. यात विश्वानंद सरस्वतीही जागीच ठार झाला. पोलिसांनी या झोपडीतून दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून काही ग्रामस्थांनाही ताब्यात घेतलंय.

विशेष म्हणजे विश्वानंद सरस्वती या साधूला महेशच्या आजोबांनीच या गावात आणलं होतं. यांनीच विश्वानंद सरस्वतीसाठी झोपडीही बांधली होती. इतकंच नाही तर महेश स्वत: रोज या साधूला जेवण घेऊन जात होता. मग असं काय झालं की ज्यामुळे हे साधू महाराज इतके निष्ठुर झाले. असं काय होतं त्या मोबाईलमध्ये की ज्यामुळे संतप्त होऊन साधूनं थेट या चिमुकल्याचा जीव घेतला. या सा-या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून बहेर येतीलच मात्र वैजापूरात घडलेली ही घटना अध्यात्माला लागलेला बट्टाच म्हणावी लागेल.