हिंदू बायकोने बुरखा घातला नाही म्हणून मुस्लीम पतीने चिरला गळा

मुस्लीम पतीला राग अनावर झाल्याने त्याने पत्नीची हत्या केलीय

Updated: Sep 27, 2022, 11:08 AM IST
हिंदू बायकोने बुरखा घातला नाही म्हणून मुस्लीम पतीने चिरला गळा title=

मुंबई : धार्मिक रितीरिवाज (muslim rituals) पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मिय विवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरून हत्या (murder) केली आहे. टिळकनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपी पतीने आपल्या 23 वर्षीय पत्नीचा भरदिवसा चाकूने गळा चिरून खून केला. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेखने (iqbal shekh) रुपाली चंदनशिवेसोबत (rupali chandanshive) विवाह केला होता. दोघांना एक मुलगाही आहे. इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय रुपालीला नेहमी मुस्लिम चालीरीतींचे  (muslim rituals) पालन करण्यास आणि बुरखा (burka) घालण्यास सांगत होते. पण रुपालीला हे मान्य नव्हते.

यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण देखील झाले. त्यामुळे रुपाली इक्बालपासून वेगळी राहू लागली. मात्र, दोघांमध्ये फोनवर वारंवार बोलणे होत होते. सोमवारी इक्बालने रुपालीला भेटण्यासाठी बोलावले. याच गोष्टीवरून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. रागाच्या भरात रुपालीने आरोपी पतीकडे घटस्फोट मागितला होता. (Mumbai Refusing to wear burqa angry Muslim husband kills Hindu wife)

सुरुवातीला इक्बालने मुलाचा हवाला देत त्यांची समजूत घालण्यास सुरुवात केली. मात्र रुपाली घटस्फोटाच्या मुद्द्यावर ठाम असताना इक्बालने रुपालीला रस्त्यावर ओढले. त्यानंतर चाकूने गळा चिरला, त्यामुळे रुपालीचा जागीच मृत्यू झाला. रुपालीचा आरडाओरडा ऐकून लोक तेथे जमा होऊ लागले. लोकांना पाहताच इक्बालने तेथून पळ काढला.
लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुपालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला आणि काही वेळातच त्याला अटक केली.

पोलीस चौकशीत इक्बालने सांगितले की, हा त्याचा दुसरा विवाह होता. यापूर्वीही त्याचे लग्न झाले होते. पण पहिल्या पत्नीपासून त्याला मूल होत नसल्याने इक्बालने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्याने रुपाली चंदनशिवेसोबत लग्न केले. रुपाली आणि तिचा मुलगा इक्बालसोबत राहत होते. मात्र रुपाली काही दिवसांपूर्वी त्याच्यापासून वेगळे राहू लागली.  सोमवारी भांडणानंतर तो चिडला आणि त्याने रुपालीचा चाकूने गळा चिरून खून केला.

महाराष्ट्रात पसरतंय लव्ह जिहादचं जाळं?

देशभरात वारंवार लव्ह जिहादच्या घटना समोर येत असल्याने महाराष्ट्रातही याचा प्रसार होतोय का अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरुन लव्ह जिहादबाबतही महाराष्ट्रात चर्चा सुरु झालीय. काही दिवसांपूर्वी अमरावतीचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी लव्ह जिहाद असल्याचा दावा केला होता. धारणी येथे राहणाऱ्या एका हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणाने पळवून नेले आणि अमरावतीत आणले. जिथे तिचा चंद्रविला ट्रस्टमध्ये विवाह झाला. या प्रमाणपत्रावर काजीने सही केल्याची माहिती समोर आली. यानंतर लव्ह जिहाद अंतर्गत मुस्लिम तरुण तरुणींना टार्गेट करत असल्याचा आरोप खासदार बोंडे यांनी केला होता.