'गरीबनगर' पुन्हा पेटलं, ५० हून अधिक झोपड्या खाक

बांद्रा येथील झोपडपट्टीला आग लागली की लावली गेली?

Updated: Oct 30, 2018, 02:08 PM IST
'गरीबनगर' पुन्हा पेटलं, ५० हून अधिक झोपड्या खाक title=

मुंबई : मुंबईतल्या वांद्रे पश्चिमेला असणाऱ्या गरीबनगर झोपडपट्टीला लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. तर या आगीत दोन जण जखमी झालेत. त्यांच्यावर बांद्रा भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, बांद्रा येथील झोपडपट्टीला आग लागली की लावली गेली? याची चौकशी होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी दिलीय. 

त्याचप्रमाणे वारंवार याच ठिकाणी आगीच्या घटना का घडतात? यापूर्वी आग लावल्याचं समोर आले आहे.

तसंच इथल्या झोपड्यांवर वाढत जाणारे अनधिकृत इमले कसे उभे राहतात? असा सवालही त्य़ांनी उपस्थित केलाय.