आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू

राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,६३,७९९ वर पोहोचली आहे.

Updated: Sep 23, 2020, 07:46 PM IST
आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू title=

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १९,४७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,६३,७९९ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,५६,०३० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७३,४७७ रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.६५ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६८ टक्के इतका आहे.

आतापर्यंत राज्यात ६१,०६,७८७ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १२,६५,७९९ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

सध्या राज्यात १८,७५,४२४ जण होम क्वारंटाईन असून ३४,४५७ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.