भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती. महामानवाला देशभर अभिवादन. 

Updated: Apr 14, 2018, 07:27 AM IST
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन title=

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती. महामानवाला देशभर अभिवादन. मुंबईत चैत्यभूमी, महाडच्या चवदार तळ्यावर भीमसागर उसळला आहे. दरम्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतल्या दादर इथल्या इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्मारक उभारण्यात येणारं आहे. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारऱ्या बाबासाहेबांच्या स्मारकाची दृश्य स्वरुपात इमारत २०१९पर्यंत उभी राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७  वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला.

तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. गरीबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं असल्यानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला झी २४ तासचाही सलाम.