कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाची पायाभरणी; .कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या 27 गावांना मोठा फायदा

कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात जाली आहे. मेट्रोच्या कामाची पायाभरणी करण्यात आली आहे, 

Updated: Mar 9, 2024, 10:36 PM IST
कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाची पायाभरणी; .कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या 27 गावांना मोठा फायदा  title=

Kalyan Taloja Metro 12 :  कल्याणमधील तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात झाली. कोळेगावात नवीन पलावा रस्त्यावर मेट्रो रेल्वेची पायाभरणी केली.3 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आठवडाभरात या कामाला सुरुवात झाली आहे. नियोजीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. 

कल्याण-तळोजा मेट्रो-12च्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 मार्च 2024 रोजी भूमीपूजन झाले. 20 किलोमीटरच्या या मार्गावर 19 स्टेशन असणार आहेत. ऑक्टोबर 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यासाठी 5865 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कल्याण, भिवंडी, ठाणे या मेट्रो मार्गाचं एकत्रीकरण होणार आहे .कल्याण-डोंबिवली आणि आजूबाजूच्या 27 गावांना मोठा फायदा होणार आहेय

मुंबई महानगर प्रदेशात होणारी लोकसंख्या वाढ, विकास व रोजगार वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आवश्यक असणारे परिवहन जाळे यांचा पूर्णपणे अभ्यास करुन सर्वंकष परिवहन अभ्यास सन 2008 मध्ये पूर्ण केला. तसेच कल्याण-डोंबिवली या शहरातील वाढती लोकसंख्या व आजूबाजूचा होणारा विकास, 27 गावांचा विकास आराखडा, कल्याण विकास केंद्र व NAINA चे क्षेत्र तसेच कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबई या शहराला जोडण्याची निकड लक्षात घेता,  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो मार्ग-5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) हा मेट्रो मार्ग विस्तारित करुन कल्याण ते तळोजा (डोंबिवली मार्गे) प्रस्तावित केला आहे.

कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त 45 मिनिटांत 

  • वाहतुकीच्या वेळेत होणारी बचत : 45 मिनिटे (कल्याण-तळोजा).
  • ठाणे-भिवंडी-कल्याण आणि नवी मुंबई मेट्रो मार्गासह मेट्रो मार्ग 12 चे एकत्रीकरण, ज्यामुळे मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होईल आणि प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येईल.. 
  • मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे मोठ्या संख्येने लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  • मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे गुंतवणूक आकर्षित करून आणि मेट्रो स्थानकांभोवती व्यावसायिक आणि रिअल इस्टेट विकासाला चालना देऊन आर्थिक वाढीस चालना देऊ शकते.
  • मुंबई मेट्रो मार्ग 12 वाहतुकीचा एक सुरक्षित आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करेल, ज्यामुळे रस्त्यावरील प्रवासाशी संबंधित अपघातांचा धोका कमी होईल. हे रहिवासी आणि अभ्यागतांसाठी गतिशीलता वाढवू शकते.
  • प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे वाहनांच्या संख्येत घट झाल्याने रस्ते बांधणी आणि देखभाल याचा खर्च कमी होईल.
  • मुंबई मेट्रो मार्ग 12 सुरू केल्याने लोकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करून, रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकते आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.
  • अधिक लोक त्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून मेट्रोची निवड करत असल्याने, इंधनाच्या वापरात घट होईल, ज्यामुळे हरित वायू (Greenhouse Gases) उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल.
  • मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे वायू प्रदूषण कमी होईल, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर न करता इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड मेट्रो गाड्यांकडे वळल्याने वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते, ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला फायदा होईल.
  • मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे, बसेस आणि ऑटो रिक्षांची वाहनांच्या संख्येत घट होऊ शकते, ज्यामुळे रस्त्यांवर कमी गर्दी होईल आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारेल व प्रवाश्यांना उत्तम आरामदायी व्यवस्था मिळेल, त्यामुळे जीवनाचा दर्जा सुधारेल.
  • सदर मार्गिका ही सिडको व एमआयडीसी क्षेत्रातून जात असल्याने या क्षेत्रांना भविष्यातील प्रगतीला वाव मिळेल.  
  • या मार्गिकेचा उद्देश मुंबई शहर आणि त्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील विकास कामांना गती देणे आहे.
  • ⁠ही मार्गिका इतर १३ मार्गिकांशी आणि नवी मुंबई मेट्रोशी जोडली जाणार असल्याने तळोजाहून दक्षिण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, विरार असा कुठेही प्रवास मेट्रो नेटवर्क ने करण सोप होईल.