शेतकऱ्यांकडून १ लाखांची लाच घेताना महावितरणाच्या तिघांना अटक

  शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून  बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे. 

Updated: Feb 3, 2018, 08:43 AM IST
शेतकऱ्यांकडून १ लाखांची लाच घेताना महावितरणाच्या तिघांना अटक title=

उस्मानाबाद :  शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून  बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे. 

दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी

तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील बोअर वेल विजेचा डीपी नादुरुस्त असल्याने गेल्या ६ महिन्यापासून बंद आहे.हा डीपी दूरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

महावितरणचा सहायक जाळ्यात

त्यानंतर पहिला १ लाख रुपये लाचेची हप्ता मुरूम मोड येथे घेताना महावितरणचा सहायक अभियंता सुधीर बुरनापल्ले , वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग सिद्धराम जाधव या तिघांना अटक करण्यात आली.