शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Jan 23, 2018, 04:00 PM IST
शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया title=

दावोस : शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. युतीचं सरकार पाच वर्षपूर्ण करेल असा विश्वास त्यांनी दावोसमध्ये व्यक्त केला. शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आहे याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. शिवसेना बऱ्याच गोष्टी बोलते पण मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असंही फडणवीस म्हणाले. तसंच पुढच्या निवडणुकीतही आम्ही जिंकू असा विश्वास  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

भाजपचा सर्वात जुना मित्र आणि एनडीएचा भाग असलेल्या शिवसेनेने २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युती टिकवण्यासाठी शिवसेनेने नेहमी प्रयत्न केला. पण भाजपने त्यांना खालचा दर्जा दिला. शिवसेना आता स्वाभिमानाने चालेल असं शिवेसेनेने म्हटलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक शिवसेना एकटीच लढणार आहे.

पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

बैठकीनंतर बोलतांना उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं. पाकिस्तानच्या मुद्द्यावर उद्धव यांनी टीका केली. निवडणुकीत पाकिस्तान आठवतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे. हा सगळा प्रकार संताप येतो असं देखील त्यांनी म्हटलं. नेव्हीवर केलेल्या नितीन गडकरींच्या वक्तव्यावर देखील उद्धव यांनी टीका केली. ५६ इंचाच्या छातीत शौर्य देखील असं त्यांनी म्हटलं आहे. सत्तेची हवा सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक राज्यात निवडणूक लढवणार

प्रत्येक राज्यात निवडणूक लढवण्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवू असं देखील त्यांनी म्हटलं आहे. गाय मारणं तसं थापा मारणं देखील पाप आहे. असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असं उद्धव यांनी म्हटलं आहे, सत्तेसाठी भांडी घासणारं हिंदुत्व आम्हाला नको. आपल्या परिने हिदुत्त्वाचा अर्थ लावला जातोय.

उद्धव ठाकरेंचं अनकट भाषण