गडकरींकडे जलसंपदा खातं आल्याचा महाराष्ट्राला फायदा...

नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं येताच नदी जोड प्रकल्पांच्या कामांना वेग येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

Updated: Sep 8, 2017, 07:05 PM IST
गडकरींकडे जलसंपदा खातं आल्याचा महाराष्ट्राला फायदा...  title=

मुंबई : नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं येताच नदी जोड प्रकल्पांच्या कामांना वेग येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

महाराष्ट्रातल्या नदीजोड प्रकल्पाच्या कामांना पुढच्या तीन महिन्यांत सुरू करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केलीय. येत्या १२-१३ सप्टेंबरला नदीजोड प्रकल्पांबाबत गुजरातसोबत करार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच राज्यातले अपूर्ण असलेले २६ सिंचन प्रकल्प पुढच्या एक ते दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. राज्याची सिंचन क्षमता ४९ टक्के आहे. 

मात्र, राज्यात २२ टक्केच सिंचन आहे. हे ४० टक्क्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. यावळी दमनगंगा - पिंजाळ आणि नार - पार नदी जोड प्रकल्पावर चर्चा करण्यात आली.