लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर

ST Ticket Fare Hike: महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 16, 2024, 09:56 AM IST
लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर title=

ST Ticket Fare Hike In Marathi:  सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. मात्र याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. तसेच उन्हाळी सुट्यांत अनेकजण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. या काळात स्थलांतरित झालेल्यांची संख्या 13,000 पर्यंत वाढते. दररोज सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात. आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसून वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. दरम्यान याच भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. 

किती वाढणार तिकीट दर?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

केव्हापासून लागू होणार नवीन निर्णय?

दरम्यान, ही तिकीट दरवाढ हंगामी  राहणार असून म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे.  त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात येते. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने  निवडणूक आयोगाची परवागनी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.

2018 मध्ये झाली होती सर्वात मोठी दरवाढ

 2018 मध्ये दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने 20 टक्के भाडेवाढ केली होती. डिझेलचे वाढलेले दर आणि कोरोनामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता.  भाडेवाढीमुळे प्रवाशांची आर्थिक कोंडी देखील झाली होती. शिवशाहीतून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना 545 रुपये मोजावे लागणार आहेत. 

उन्हाळी सुट्टीसाठी एसटीच्या विशेष गाड्या 

राज्यातील सर्वात कठीण मार्गांवर आणि प्रादेशिक स्तरावर स्थलांतरितांच्या मागणीनुसार विशेष गाड्या चालवल्या जातील. गर्दीच्या मार्गांवर मध्यवर्ती कार्यालयातून 496 बसेस चालवण्यात येणार आहेत. मुंबई राज्यात 211, पुण्यात 332, छत्रपती संभाजीनगरमध्ये 249, नाशिकमध्ये 199, अमरावतीमध्ये 51 आणि नागपूर राज्यात 46 विशेष गाड्या धावत आहेत. प्रत्येक विशेष ट्रेन सरासरी 450 किलोमीटर अंतराचा प्रवास करेल. त्यामुळे सुमारे पाच लाख किलोमीटर परप्रांतीय कामगारांची वाहतूक करण्याचा महामंडळाचा विचार आहे, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.