राज ठाकरे यांची सभा काही झालं तरी होणार, 'मनाई असो की जमावबंदी?'

MNS Rally in Aurangabad : औरंगाबाद शहरात जमावबंदी आदेश लावा नाहीतर आणखी काहीही करा. सभा होणारच, यावर मनसेच ठाम आहे. 

Updated: Apr 26, 2022, 02:50 PM IST
राज ठाकरे यांची सभा काही झालं तरी होणार, 'मनाई असो की जमावबंदी?' title=

औरंगाबाद : MNS Rally in Aurangabad : औरंगाबाद शहरात जमावबंदी आदेश लावा नाहीतर आणखी काहीही करा. आम्ही सभेसाठी सर्व कागदपत्र पोलिसांनी दिली आहे. आम्ही सभेसाठी परवानगी मागितलेली आहे. जर परवानगी दिली नाही तरी सभा होणारच, यावर मनसेच ठाम आहे. सभेसाठी मनसे आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत सभा होणारा असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच आजपासून यासाठी मनाई आदेश

औरंगाबादमध्ये कोणत्याही परिस्थितीत 1 मे महाराष्ट्र दिनी हिंदूजननायक राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचा निर्धार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. औरंगाबाद मध्ये 9 मे पर्यंत मुंबई पोलीस कायद्यान्वये मनाई आदेश स्थानिक प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही याबद्दल मनसैनिकात संभ्रम होता. पण दिलीप धोत्रे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला 1 एक लाख लोक जमतील. राजसाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. त्यामुळे सभा ही त्याच दिवशी त्याच तारखेला होणार आहे, अशी माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली.

राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये मनाईआदेश (Prohibition order) लागू करण्यात आले आहेत. औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळेनिदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे 1 मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का, याची मोठी उत्सुकता आहे.