हिंगोलीतील जवान बावीस दिवसापासून बेपत्ता

हिंगोली जिल्ह्यातील गुंजचे सैनिक बाळू नरवाडे हे गेल्या बावीस दिवसांपासून मिसिंग आहेत. 

Updated: Sep 10, 2017, 07:22 PM IST
हिंगोलीतील जवान बावीस दिवसापासून बेपत्ता title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी  : हिंगोली जिल्ह्यातील गुंजचे सैनिक बाळू नरवाडे हे गेल्या बावीस दिवसांपासून मिसिंग आहेत. नरवाडे एक महिन्याच्या सुट्या घालवून २० ऑगस्ट रोजी सायंकाळी संचखंड एक्स्प्रेसने लुधियाना येथे ड्युटी जॉईन करण्यासाठी निघाले होते. पण ते अद्यापपर्यंत मिल्ट्री कॅम्पवर पोहोचले नसल्याने सैनिकाचे कुटुंबिय भयभीत झालेत. २२ दिवस उलटून ही त्यांचा शोध लागत नसल्याने कुटुंबिय भयभीत झाले असून ते सरकारकडे नरवाडे यांना शोधून काढण्याची विनंती करतायेत.

फोटोत दिसणारे हे आहेत वसमत तालुक्यातील गुंज गावचे मिल्ट्रीमेन बाळू नरवाडे. गेल्या चौदा  वर्षापासून ते मिल्ट्री मध्ये आहेत. सध्या ते पंजाब मधील फिरोजपुर येथे घरबाल्स रायफल्स युनिट मध्ये हाऊसकीपर म्हणून कर्तव्यावर आहेत. ते २२ जुलै २०१७ रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. २० ऑगस्ट रोजी ते त्यांच्या सासरवाडीतून नांदेडला संचखंड एक्सप्रेस पकडण्यासाठी त्यांच्या मेव्हण्या बरोबर गेले होते. त्यांच्या मेव्हण्याने त्यांना संचखंड एक्स्प्रेसमध्ये बसवून दिल. पण ते २२  तारखे पर्यन्त फिरोजपुर येथे पोहोचलेच नसल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्काच बसला. सैनिकाच्या पत्नीने  अन्न पाण्याचा त्याग केला असून या घटनेमुळे कुटुंबिय हतबल झाली आहेत. कुटुंबिय नातेवाईक आणि गावकरी नरवाडे त्यांचा सर्वत्र शोध घेत असून रेल्वे पोलिसांकडून त्यांना मदत होत नसल्याचा आरोप सैनीकाच्या पत्नीने केलाय.

देशाच रक्षण करणारा हा सैनिक गेल्या २२ दिवसापासून संचखंड एक्सप्रेस मधून अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. सैनिकाचे भाऊ गंगाधर नरवाडे यांच्या तक्रारीवरून वसमत पोलिस ठाण्यात बाळू नरवाडे हरवल्याची बाबतची तक्रार झीरोने दाखल करून हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्यावतीने ही याबाबतचा तपास सुरू आहे.

वबाळू नरवाडे यांना एक सहा वर्षाची मुलगी आहे. तर सहा महिन्यापूर्वीच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे मुले झाले आहेत. बाळू नरवाडे हे जालन्या पर्यंत सचखंड एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होते. अस त्यांच्या मोबाईल लोकेशन वरुन पोलिसांना माहिती मिळाली आहे. पण त्यापुढे त्यांचा ठावठिकाणा मिळत नाहीय.. त्यामुळे नरवाडे यांच्या पत्नी त्यांना लवकरात लवकर शोधून काढा अशी केंद्र आणि राज्य सरकारकडे कळकळीची  विनंती करतायत. गेल्या २२ दिवसा पासून एक जवान गायब झालाय आणि तो सापडत नाही. ही बाब अत्यंत गंभीर अशीच म्हणावी लागेल.