मुलीचा प्रेमविवाह ; आईवडिलांची रेल्वेखाली आत्महत्या

मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला, यामुळे समाजात आपली बदनामी होत आहे, या नैराश्यात आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे.

Updated: Oct 28, 2017, 11:59 PM IST
मुलीचा प्रेमविवाह ; आईवडिलांची रेल्वेखाली आत्महत्या title=

सातारा : मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला, यामुळे समाजात आपली बदनामी होत आहे, या नैराश्यात आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. सातारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

कराडजवळील ओगलेवाडी एका एसटी कंडक्टरने पत्नीसोबत रेल्वेखाली उडी मारुन आपलं जीवन संपवलं. बबन पवार आणि कल्पना पवार असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव होते.

बबन पवार यांच्या मोठ्या मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला, ती पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. मुलीच्या प्रेमविवाहामुळे समाजात आपली बदनामी होत आहे. आपली मुलगी पळून गेली ही समाजात आपली बदनामी आहे, यावरून या दाम्पत्याने आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

बबन पवार यांच्या मुलीने शुक्रवारी फोन करून आपण लग्न केल्याचे आई-वडिलांना कळवले होते, त्यानंतर हे दाम्पत्य मानसिक धक्क्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.

बबन पवार यांना मोठ्या मुलीनंतर, 9 वर्षाची मुलगी आहे, तर 7 वर्षांचा मुलगा आहे. दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे या दोनही भावांडांवर दु:खाचं आभाळ कोसळलं आहे. आता त्यांच्यासमोर आणखी प्रश्न वाढले आहेत.