'राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊंना मंत्रीपद'

खासदार राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद दिलं होतं.

Updated: Sep 6, 2017, 09:47 PM IST
'राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊंना मंत्रीपद' title=

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद दिलं होतं. आता राजू शेट्टी यांचं सदाभाऊ यांच्याशी बिनसलं त्याला आम्ही काय करु अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलीय. ते कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रीपद हवं असेल तर मुख्यमंत्र्यांशी बोला, अशी ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान सरकारमधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टींनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर पुन्हा टीकेचे आसूड ओढलेत. आमचा हनुमान सत्तेच्या लंकेत रमला, असा शालजोडीतला टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी हे केंद्र आणि राज्य सरकारवर नाराज होते. अखेर त्यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतरही सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद कायम आहे.

पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील