आईने जेवण चांगलं बनवलं नाही, मुलाने उचचलं धक्कादायक पाऊल

केवळ जेवण चांगलं बनवलं नाही या क्षुल्लक कारणाने मुलाने केलं धक्कादायक कृत्य

Updated: May 5, 2022, 09:11 PM IST
आईने जेवण चांगलं बनवलं नाही, मुलाने उचचलं धक्कादायक पाऊल title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली :  आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर. मायेची पाखरण करणारी आई. आईचं प्रेम आणि पालनपोषण याची कशाबरोबरही तुलना केली जाऊ शकत नाही. पण उतारवयात आईची सेवा करण्याऐवजी आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. 

सांगली जिल्ह्यातल्या आगळगाव इथं ही दुर्देवी घटना घडली आहे. राजाका जाधव (वय 70) या आपला मुलगा दशरथ जाधव याच्यासह राहात होत्या. दशरथ याला दारूचं व्यसन आहे. दारुच्या नशेत दशरथ आपल्या आईला नेहमीच मारहाण करत असे. शुक्रवारीही दशरथने जेवणावरुन आपल्या आईशी वाद घातला. जेवण चांगलं बनवलं नाही म्हणून दशरथ संतापला.

संतापाच्या भरात त्याने आई राजाका जाधव यांना दगड वीट आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत राजाका जाधव गंभीर जखमी झाल्या. त्यांना आसपासच्या लोकांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी राजाका यांचा नातू गणेश भोसले याने कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नराधम दशरथ जाधव याला अटक केली.