'भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंडगिरी वाढली'

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात गुंडगिरी वाढत असून धर्माच्या नावाखाली गुंडगिरी सुरु असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.   

Updated: Jul 3, 2017, 09:10 PM IST
'भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंडगिरी वाढली' title=

सांगली : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात गुंडगिरी वाढत असून धर्माच्या नावाखाली गुंडगिरी सुरु असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. राज्यातल्या कृषी राज्यमंत्र्याना झोपेतही फक्त राष्ट्रवादीचे जयंत पाटीलच दिसतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर सत्ता मिळाली की काही जणांना आकाश ठेंगणं झाल्यासारख होतं. भाजप सरकारमधल्या अशाच नेत्यांची मग्रुरीची भाषा आता सुरु असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.