Good News । सांगलीत २६ कोरोना रुग्णांपैकी २५ जणांना देणार डिस्चार्ज

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला होता. २६ कोरोना बाधित रुग्णांपैकी २५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. 

Updated: Apr 11, 2020, 10:02 AM IST
Good News । सांगलीत २६ कोरोना रुग्णांपैकी २५ जणांना देणार डिस्चार्ज title=
संग्रहित छाया

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला होता. एकाच कुटुंबातील २४ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आणखी एकाला बाधा झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. तात्काळ नियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वीत केली. त्यानंतर कडक लॉकडाऊन करत परिसर सील केला.  इस्लामपूरमधील 'त्या 'कुटुंबातील सर्व कोरोना बाधित २५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. तर तर काल २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र, त्यांच्या संपर्कातील  एक महिलाच अजून पोझिटिव्ह आहे. एकूण २६ कोरोना बाधित रुग्णांपैकी २५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. त्यांना आज घरी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या त्यांना काही दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे  २६ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी गुरुवारी २४ रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली होती. सांगलीत कोरोनाचा फैलाव रोखण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह आरोग्य पथकाचे कौतुक केले आहे.

सांगली जिल्ह्यात अचानक कोरोनाचा फैलाव झाल्याने राज्य सरकारने ठोस पावले उचलली होती. इस्लामपूरमध्ये २५ जण कोरोना बाधित होते. त्याआधी  इस्लामपूरमध्ये कोरोनाचे चौदा रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले होते. दरम्यान, जिल्ह्यातील कोविड-१९ ग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुंबईतील ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची राज्य शासनाकडून नियुक्ती केली होती.

डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने तातडीने सांगलीतील परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यात यश आणले आहे. या समितीने नियोजनाचे काम २८ मार्च रोजी हाती घेतले होते.