हिंगोलीत कवडी येथे 3 जणांचा बुडून मृत्यू

मुलांना वाचवायला गेलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Updated: Aug 2, 2018, 03:58 PM IST
हिंगोलीत कवडी येथे 3 जणांचा बुडून मृत्यू title=

हिंगोली : हिंगोलीमधल्या कळमनुरी तालुक्यातल्या कवडी इथे तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सातव्या वर्गात शिकणारा सुखदेव सुभाष राऊत, सहाव्या वर्गात शिकणारा संभाजी प्रकाश पतंगे आणि विशाल बनसोडे हे शेवाळा इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिकत होते. शाळा सुटल्यानंतर गावाकडे जात असतांना कवडी शिवारातील गावानजीक असलेल्या खदानीत पाय घसरून पडले. खदानीत आठ ते दहा फुट खोल पाणी असल्याने मूल बुडत असतांना विशाल बनसोडे याने आरडा ओरड केल्यानंतर शेजारी गुरे चारणारे शेतकरी दत्तराव नामदेव पतंगे यांनी तात्काळ खदानीकडे धाव घेवून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. 

तिघांपैकी विशाल बनसोडे यास खदानीबाहेर काढून दत्तराव यांनी इतर दोघांना वाचविण्यासाठी खदानीत उडी घेतली. जीवाच्या आकांताने खदानीतील दोन्ही मुलांनी दत्तराव यांच्या गळ्यात पडल्याने दोन विद्यार्थ्यांसह दत्तराव पतंगे यांचा मृत्यू झाला.