...आणि प्रवाशांना न घेताच रवाना झाली ट्रेन

जयपूर जंक्शंनवर शनिवारी एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 1, 2017, 11:37 PM IST
...आणि प्रवाशांना न घेताच रवाना झाली ट्रेन title=
Image Courtesy: indiarailinfo.com

जयपूर : जयपूर जंक्शंनवर शनिवारी एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं.

जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या गणगौर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या थर्ड एसीचे तीन कोच न उघडल्याने प्रवाशांना न घेताच ट्रेन रवाना झाली. प्रवाशांना न घेताच ट्रेन निघाल्याने रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास १००हून अधिक प्रवाशांचं तिकीट कन्फर्म असतानाही त्यांना रेल्वेने प्रवास करता आला नाही. झालं असं की, गणगौर एक्सप्रेस दुपारी २ वाजता जयपूर रेल्वे स्थानकातून निघणार होती. मात्र, २२ मिनिटं झाली तरीही एसीच्या कोचेसचे गेट उघडलेच नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एसी कोचमध्ये प्रवेशच मिळाला नाही.

रेल्वे स्टेशनवर झालेल्या गदारोळात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे आणि चौकशी सुरु करण्यात आली आहे.