दिल्लीतील प्रदूषणावरुन राहुल गांधींची जोरदार टीका

'हर शख्स परेशान सा क्यों है' अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या मुद्यावरुन दिल्लीची जबाबदारी असणा-यांवर उपरोधिक टीका केलीय. 

Updated: Nov 13, 2017, 04:54 PM IST
दिल्लीतील प्रदूषणावरुन राहुल गांधींची जोरदार टीका title=

नवी दिल्ली : 'हर शख्स परेशान सा क्यों है' अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या मुद्यावरुन दिल्लीची जबाबदारी असणा-यांवर उपरोधिक टीका केलीय. 

गेल्या काही दिवसांत दिल्लीतलं प्रदूषण प्रचंड वाढलंय. प्रदूषणाच्या मुद्यावरुन आता राजकारणही सुरु झालं आहे. या प्रदूषणावरुन दिल्लीतल्या केजरीवाल सरकारने हरियाणातील भाजप सरकारला आणि पंजाबमधील काँग्रेस सरकारला जबाबदार धरलंय. 

 

आता शायराना ट्विट करत राहुल गांधींनी प्रदूषणाच्या मुद्यावर भाष्य केलंय. राहुल यांनी ट्विट केलेल्या ओळी 1978 साली आलेल्या गमन सिनेमातल्या आहेत.