पिंगलान चकमकीत अब्दुल रशिद गाझी ठार

 पिंगलान चकमकीत अब्दुल रशिद गाझी ठार झाला आहे. हा गाझी आयईडी बॉम्ब बनवण्यात शातीर होता.

Updated: Feb 18, 2019, 11:11 AM IST
पिंगलान चकमकीत अब्दुल रशिद गाझी ठार  title=

पुलवामा : पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार अब्दुल रशिद गाझीला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आल्याची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्यरात्री 1 वाजल्यापासून इथे लष्कराचे ऑपरेशन सुरु होते. अब्दुल गाझी आणि त्याचे साथीदार असलेल्या इमारतीला जवानांनी घेराव घातला होता. दरम्यान जवानांनी दहशतवादी असलेली इमारत स्फोट करुन उडवली आणि पिंगलान चकमकीत अब्दुल रशिद गाझी ठार झाला आहे. हा गाझी आयईडी बॉम्ब बनवण्यात शातीर होता. हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्यामुळे लष्कराचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. काहीवेळापूर्वी एका मोठा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर गोळ्यांचे सत्र थांबले आहे. गाझी मारल्या गेल्यानंतर पुलवामा हल्ल्यातील 3 सूत्रधारांपैकी 1 जण ठार झाला आहे. त्याला मारण्यासाठी अथवा जिवंत पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला होता.  चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद झालेत. मेजर डीएस डोंडियाल, सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल सावे राम, आर्मीचे सैनिक अजय कुमार आणि हरी सिंग यांना हौतात्म्य आले आहे. पुलवामा इथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर हे चकमकीचे ठिकाण आहे. 

गाझी हा पुलवामा आत्मघातकी हल्ल्यामधील मास्टरमाईंड मानला जातो. अब्दुल रशीद गाझी याचा पाकिस्तानशी संबंध आहे. हा खरच गाझी आहे का हे त्याला पकडल्यावर स्पष्ट होईल. पण या भागात तो वारंवार दिसून आला आहे. जर गाझी पकडण्यात आज यश आले तर लष्करासाठी खूप मोठे यश मिळणार आहे. 

पुलवामा आत्मघातकी हल्ल्यातील मास्टरमाईड गाझी सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात आला आहे. त्याला पकडण्यासाठी परिसराला घेराव घालण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. तेव्हा काही संशयितांना हेरले गेले आहे. या विभागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना लष्करी जवान प्राण पणाला लावतात पण तिथल्या स्वत:ला मानवाधिकार अधिकारी म्हणवणारे लष्करावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतात. दहशतवाद्यांशी लढताना काश्मिरमधल्या कोणत्याही माणसाला इजा झाली नाही पाहीजे. घरे कोसळली नाही पाहीजे याची काळजी घ्या असे सांगितले जाते. यामध्ये लष्करी जवानांचे जीव जात आहेत. जोपर्यंत स्थानिक लोक लष्कराला सहकार्य करत नाहीत तोपर्यंत दहशतवाद्यांशी लढणे कठीण असल्याचे भिती वर्तवण्यात येत आहे.