हनिमूनला नवऱ्यानं केलं असं कृत्य की, बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली

आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

Updated: Aug 1, 2022, 06:56 PM IST
हनिमूनला नवऱ्यानं केलं असं कृत्य की, बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली title=

मुंबई : कोणत्याही व्यक्तीसाठी लग्न हा खूप महत्वाचा टप्पा असतो. सध्या लव्ह मॅरेजचा ट्रेंड वाढत असला, तरी आजही अनेकजण घरच्यांच्या मर्जीने लग्न करतात. अशा परिस्थितीत, लग्न करण्यापूर्वी, समोरच्या व्यक्तीबद्दलच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, आता भारतातही लव्ह मॅरेजचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि लग्नाआधी लोक आपल्या जोडीदाराबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतात. असे असूनही, असे अनेक लोक आहेत, ज्यांना लग्नानंतरच आपल्या जोडीदाराची ओळख होते आणि त्यांच्या स्वभावाची जाणीव होते.

आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

येथे नवऱ्याच्या प्रेयसीमुळे महिलेचे वैवाहिक जीवन बिघडले. महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहायचे आहे, त्यामुळे तिच्या नवऱ्याचे वागणे तिच्यासोबत कधीच चांगले राहिले नाही.

26 वर्षीय महिलेने सांगितले की, 'लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने मला त्याच्या मैत्रिणीचा फोटो दाखवला. तो म्हणाला की, तो खऱ्या अर्थाने त्याच्या गर्लफ्रेंडला त्याची पत्नी मानतो. मैत्रिणीसोबतच्या संबंधामुळे तो माझ्याशी खूप गैरवर्तन करतो.

महिलेने सांगितले, 'तीन वर्षांपूर्वी माझे लग्न ठरले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने मला एका मुलीचा फोटो दाखवला. जिला तो त्याची गर्लफ्रेंड म्हणत होता. यामुळे आमच्यात खूप भांडण झाले आणि माझ्या पतीनेही मला खूप मारले. महिला म्हणाली, 'माझे रडणे ऐकून माझा दीर तेथे आला आणि त्याने मला माझ्या पतीपासून वाचवले.'

महिलेने सांगितले की, 'लग्नानंतर काही दिवसांनी मी माझ्या माहेरी आले असता, माझ्या सासरच्या लोकांनी मला परत घरी येण्यास नकार दिला. दरम्यान, माझ्या सासरच्या घरी एक अपघात झाला. माझ्या दीराचा मृत्यू झाला.

महिलेने सांगितले की, ''माझ्या पतीच्या भावाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मी सासरच्या घरी गेले. सासरच्या घरी गेल्यावर माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत खूप भांडण झाले आणि मी परत माझ्या घरी आले.''

काही दिवसांनी माझा नवरा नशेच्या अवस्थेत माझ्या घरी आला आणि तिथे त्याने खूप गोंधळ घातला. यामुळे आम्हाला पोलिसांना बोलवावे लागले.

पोलिसांनी दोघांमध्ये समझोता केला आणि दोघे पुन्हा एकत्र राहू लागले. महिला म्हणाली, 'आमच्या नात्यात काहीच सुधारणा झाली नाही. आमची रोज भांडणे व्हायची. त्यामुळे मी माझ्या माहेरी पुन्हा आले आणि त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.