गोरखपूर बालमृत्यू प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं

७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.

Updated: Aug 15, 2017, 04:01 PM IST
गोरखपूर बालमृत्यू प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं title=

नवी दिल्ली : ७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशाला स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच गोरखपूरमध्ये झालेल्या बालमृत्यूंवरही मोदींनी भाष्य केलं. सगळा देश या पीडितांसोबत आहे, असं मोदी म्हणाले.

गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये एका आठवड्यात ७० लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाले आहेत. याप्रकरणी बीआरडी मेडिकल कॉलेजच्या प्रिसिंपकना निलंबित करण्यात आलं आहे.