गावाला माहित होती दोघांची love Story, तरूणाने धोका दिल्यावर जे घडलं त्याने गाव हादरलं!

प्रेमात धोका झाल्यावर तरूणीने जे केलं त्याने सर्वांनाचा बसला धक्का

Updated: Sep 28, 2022, 10:17 PM IST
गावाला माहित होती दोघांची love Story, तरूणाने धोका दिल्यावर जे घडलं त्याने गाव हादरलं! title=

Crime News : प्रेम हे आंधळ असतं असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. आजकालची तरूण मुल-मुली प्रेम करतात मात्र त्याच प्रेमाने धोका दिल्यावर स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करतात. असच एक प्रकरण समोर आलं आहे. 18 वर्षाच्या तरूणीने गळफास घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. 

नक्की काय आहे प्रकरण? 
अनेक वर्षांपासून तरूणीचं गावातील रहिवासी प्रत्युषसोबत प्रेमसंबंध सुरू होते. संपूर्ण गावाला दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती होती.  प्रत्युष तरूणीसोबत लग्न करणार असल्याची चर्चा होती. लग्नाची वेळ आल्यावर प्रत्युषने नकार दिला. तरूणीला ही गोष्ट सहन होत नव्हती. फसवणूक झाल्याच्या दु:खात तरूणीने थेट जग सोडण्याचा विचार केला. 

मृत्यूपूर्वी तरूणीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये लिहिले आहे की, माझ्या मृत्यूला प्रत्युष जबाबदार आहे, आधी त्याने माझ्यासोबत प्रेम करण्याचे नाटक केलं, शरीरसंबंध ठेवले नंतर मन भरून आल्यावर निघून गेला. तुम्ही लोक त्याला सोडून जाऊ नका प्लीज मी त्याच्याशिवाय जगू शकत नव्हते पण मरू तर शकते, असं तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

 सुसाईड नोटमधील अक्षर आणि तरूणीचं अक्षर हे जुळवून पाहिलं जाणार आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल करून मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या प्रत्युष फरार असून शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे.