पेपर फुटीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

महाराष्ट्रातल्या सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Jaywant Patil Updated: Mar 30, 2018, 07:56 PM IST
पेपर फुटीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावीचा सीबीएसईचा गणिताचा पेपर फुटला होता, त्याची फेरपरीक्षा महाराष्ट्रात होणार नाही. सीबीएसईची दहावीची परीक्षा फक्त दिल्ली आणि हरियाणामध्ये होणार आहे. मात्र सीबीएसईची बारावीची फेरपरीक्षा 25 एप्रिलला होणार आहे. ती महाराष्ट्रातही होणार आहे. 

शिक्षण सचिवांची दिल्लीत घोषणा

सीबीएसईचा बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. तो पुन्हा 25 एप्रिलला होणार आहे. शिक्षण सचिव अनिल स्वरुप यांनी दिल्लीत ही घोषणा केली आहे.