दूध जास्त उकळलं तर भांड्याबाहेर येतं; मग पाणी का बाहेर येत नाही?

दुध उकळायला आल्यानंतर ते पातल्याबाहेर जाऊन पडते. पण पाण्याच्या बाबतीत मात्र असं होतं नाही. पाणी उकळण्याच्या अवस्थेत आल्यानंतर ते भांडण्यातच उकळत राहते. 

Updated: Oct 29, 2022, 07:59 PM IST
दूध जास्त उकळलं तर भांड्याबाहेर येतं; मग पाणी का बाहेर येत नाही? title=

Scientific Reason Why Milk Overflows: दूध उकळताना पातेल्यातून सगळं दूध (why Milk overflows while Boiling) बाहेर येतं ही गोष्ट आपल्यासाठी काही नवीन नाही परंतु हीच गोष्ट पाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाणी मात्र बाहेर येत नाही असं का? याचं कारण तुम्हाला माहितीये का? कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय? तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. (why milk overflows after boiling but not water learn what are the reasons)

दुध उकळायला आल्यानंतर ते पातल्याबाहेर जाऊन पडते. पण पाण्याच्या बाबतीत मात्र असं होतं नाही. पाणी उकळण्याच्या अवस्थेत आल्यानंतर ते भांडण्यातच उकळत राहते. दुधाला जेव्हा उकळी येते तेव्हा आणि पाण्याला येते तेव्हा एक विशिष्ट प्रकारची वैज्ञानिक प्रक्रिया ही घडत असते. तेव्हा जाणून घेऊया त्या कारणांबद्दल अगदी सोप्या भाषेत. 

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

दुधामध्ये चरबी (Fats), प्रथिने (Proteins), कर्बोदके (Carbohydrates), जीवनसत्त्वे (Vitamins) आणि अनेक प्रकारची खनिजे (Minerals) असतात. दुधात चरबी आणि प्रथिने सर्वाधिक प्रमाणात आढळतात. दुधात 87 टक्के पाणी (Water), 4 टक्के प्रथिने आणि 5 टक्के लॅक्टोज (Lactose) असते. कारण दुधामध्ये सर्वात जास्त पाणी असते, म्हणून ते गरम केल्यावर दूधाचे रूपांतर वाफेत बदलू लागते. 

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

काय आहेत शास्त्रीय कारणं? 
वास्तविक दुधात असलेले फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे वजनाने हलके असतात त्यामुळे दूध गरम झाल्यावर वरच्या पृष्ठभागावर तरंगू लागते. त्यामुळे जास्त पाणी तळाशी राहते. या पाण्याची हळूहळू वाफ होत आहे पण वर चरबी, जीवनसत्त्वे आणि इतर गोष्टींचा थर वाफ बाहेर पडू देत नाही. पण असे म्हटले जाते की जो संख्या किंवा प्रमाणात जास्त आहे तो अधिक प्रभावी आहे. पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने वरचा थर काढल्यानंतर त्याचे बाष्पीभवन होते त्यामुळे वरचा थर उकळून बाहेर पडतो आणि भांड्यात फक्त उरलेले दूध उकळत राहते. 

पाण्यात चरबी, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे इत्यादी नसतात. त्यामुळे पाण्यावर कोणत्याही प्रकारचा थर तयार होत नाही आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी वाफेची गरज भासते. त्यामुळे भांड्यातच पाणी उकळते आणि बाहेर पडत नाही.