...जेव्हा विवेक ओबेरॉय म्हणाला होता- 'ऐश्वर्या रायचं हृदय प्लास्टिकचं!'

ऐश्वर्या राय ही एक अशी अभिनेत्री आहे जिची चर्चा सर्वाधिक होते. गेले अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या विभक्त होण्याच्या बातम्यानी जोर धरला होता. मात्र लग्नाआधी तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं.

Updated: Jan 19, 2024, 01:18 PM IST
...जेव्हा विवेक ओबेरॉय म्हणाला होता- 'ऐश्वर्या रायचं हृदय प्लास्टिकचं!' title=

मुंबई : ऐश्वर्या आणि सलमान खान त्यांच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत होते. जेवढी त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा झाली तितकीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपची झाली. सलमान ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचं नाव विवेक ऑबेरॉयसोबत जोडलं गेलं. विवेक ओबेरॉय ने 'कंपनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर या दोघांच्या प्रेमाच्या चर्चाही वाऱ्यासारख्या पसरु लागल्या. ऐश्वर्या विवेकच्या अफेअर दरम्यान ऐश्वर्या करिअरच्या बाबतीत उंचीच्या शिखरावर पोहचली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. ब्रेकअपच्या बऱ्याच वर्षानंतर विवेकने एका रिएलिटी शोदरम्यान विवेकने त्यांच्या ब्रेकअपमागचं कारण सांगितलं.

या सिनेमातून सुरु झाली ऐश्वर्या विवेकची लव्हस्टोरी
विवेक ऑबेरॉय आणि ऐश्वर्याच्या अफेअर्सच्या चर्चा २००३ ते २००५ पर्यंत सतत चर्चेत होत्या. या दिवसात या दोघांची पहिली भेट 'क्यों हो गया ना' या सिनेमाच्या सेटवर झाली. यानंतर या दोघांची जवळिकता वाढू लागली आणि दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली मात्र एका प्रेस कॉन्फरंन्सनंतर सगळं काही असं बदललं की दोघांचं ब्रेकअप झालं. 

या कारणामुळे झाले वेगळे
विवेक ऑबेरॉयने ऐश्वर्याला डेट करत असतान एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान विवेकने म्हटलं, काल रात्रीपासून आणि पहाटे ५ वाजेपर्यंत सलमान खान त्याला फोन करत होता. सलमानने फोनवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली.  विवेकने पुढे असंही सांगितलं की, त्याने हे सगळं यासाठी केलं कारण, तो ऐश्वर्याला डेट करत होता आणि यामुळे सलमान खान चिडला होता.'' असं विवेक या प्रेस कॉन्फरन्सवेळी म्हणाला. विवेकच्या या प्रेस कॉन्फरन्सनंतर ऐश्वर्या आणि विवेकमध्ये दुरावा येऊ लागला. विवेकच्या म्हणण्यानुसार, या गोष्टीमुळे ऐश्वर्या खूप नाराज झाली होती. तिचं म्हणणं आहे की, त्यांच्या नात्याच्या बाबतीत याप्रकारे पब्लिकली बोलणं ठिक नव्हतं. 

 
ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनेक वर्ष विवेकने आपल्या रिलेशनशिपवर ओपनली कधीच फारसा बोलला नव्हता. मात्र फरान अख्तरच्या चॅट शोमध्ये विवेकने आपल्या रिलेशनशिपवर उघडपणे आपलं मत मांडलं होतं. यावेळी बोलताना विवेक म्हणाला, - 'प्लॅस्टिक कंपन्यांकडे जेवढे प्लास्टिक आहे. आपल्या इंडस्ट्रीत त्याहून अधिक आहे. प्लास्टिक स्माईल,  प्लॅस्टिकचं हृद्य सगळं काही ईथे प्लास्टिकचं आहे. यानंतर फराह खानने विवेकला विचारलं की, तू रिलेशनशिपमधून काय शिकलास? यावरं उत्तर देत विवेक म्हणाला, 'मी जे काही शिकलो ते म्हणजे तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा.'