आधी Miscarriage आणि मग घटस्फोट 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं असं काही की वाचून तुम्हालाही बसेल धक्का

या अभिनेत्रीचा आज 37 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Updated: Feb 13, 2023, 05:05 PM IST
आधी Miscarriage आणि मग घटस्फोट 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं असं काही की वाचून तुम्हालाही बसेल धक्का title=

Rashami Desai: बॉलिवूडपासून ते टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीपर्यंत रश्मी देसाईने (Rashami Desai) तिची छाप सोडली आहे. रश्मीचे खासगी आयुष्य तिच्या करिअर पेक्षा जास्त चर्चेत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. रश्मी देसाई ही 37 वर्षांची आहे. रश्मीचा 1986 साली जन्म झाला होता. रश्मीनं वयाच्या 16 ते 17 वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. खरंतर, 2006 सालीच रश्मीनं 'रावण' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 

यापूर्वी रश्मीनं काही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले होते. रश्मीला खरी ओळख ही 'उतरन' मालिकेतून मिळाली. रश्मी ही नेहमीच तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. रश्मीनं 2012 मध्ये 'उतरन' या मालिकेतील तिचा सह-कलाकार नंदीश संधूशी लग्न केलं. त्या दोघांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. काही काळातच त्यांच्या वाद होऊ लागले होते. रश्मिका आणि नंदीशनं लग्नाच्या 4 वर्षानंतर घटस्फोट घेतला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रश्मी देसाईला गर्भपाताचा त्रास सहन करणे खूप कठीण होते. गरोदरपणात पहिले मूल गमावल्यानंतरही तिने स्वत:ला सांभाळले आणि काम सुरूच ठेवले. तिच्या कामामुळेच ती यातून बाहेर पडली असं म्हटलं जातं. गर्भपात झाल्यानंतर रश्मीनं स्वत: ला कामात गुंतवून ठेवले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नंदिशपासून घटस्फोट घेतल्यानंतर रश्मी देसाईचं नाव हे वयानं 10 वर्षानं लहान असलेल्या लक्ष्य लालवानीशी जोडण्यात आले आहे. वयातील अंतरामुळे रश्मीची आई तिच्या नात्याला विरोध करत होती. त्यामुळे रश्मी लक्ष्यपासून विभक्त झाली. 

हेही वाचा : 'या' अभिनेत्यानं चार वेळा केलं लग्न! एक पळून गेली तर दुसरीला आईनं फेकून मारली चप्पल

दरम्यान, त्यानंतर सिद्धार्थ शुक्लासोबत रश्मीचं नाव जोडण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि रश्मीनं 'दिल से दिल तक' या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्या दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री पाहायला मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेच्या सेटवर सिद्धार्थ आणि रश्मी जवळ आले आहेत. मात्र, त्यांचं नातं जास्त वेळ टिकले नाही. सिद्धार्थनंतर रश्मीचं नाव 'बिग बॉस 13' स्पर्धक अरहान खानसोबत जोडण्यात आले होते. 'बिग बॉस 13' मध्ये सलमान खाननं अरहान खानच्या लग्नाचा खुलासा केला होता. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरहाननं आपल्या लग्नाची गोष्टी रश्मीपासून लपवून ठेवली होती आणि तिला ती गोष्टी अशी अचानक कळल्यामुळे तिनं अरहानसोबत ब्रेकअप केला.