'सुख म्हणजे काय असतं' मालिकेतील जयदीप-गौरीचा मोठा निर्णय

 आता या मालिकेत एक स्पेशल भाग दाखवण्यात येणार आहे.

Updated: Nov 22, 2021, 04:24 PM IST
'सुख म्हणजे काय असतं' मालिकेतील जयदीप-गौरीचा मोठा निर्णय title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे.

त्यात या मालिकेतील प्रत्येक वळण प्रेक्षकांमध्ये येणाऱ्या भागाबद्दल उत्सुकता निर्माण करणार ठरत आहे. 

या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या नात्याबद्दल सर्वात जास्त चर्चा होताना दिसते. त्यांची वाढत जाणारी जवळीक मालिकेत दिसून आली. आता या मालिकेत एक स्पेशल भाग दाखवण्यात येणार आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta - Watch Episode 64 - Gauri, Jaydeep Perform a  Puja on Disney+ Hotstar

जयदीप आणि गौरी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. हा शाही विवाहसोहळा लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

जयदीपने एक मित्र म्हणून नेहमी गौरीची साथ दिली, नवरा म्हणून तिच्यासोबत सुख दु:खात उभा राहिला.