'दिल दोस्ती दोबारा' घेणार प्रेक्षकांचा निरोप

सहा मित्रांच्या गोष्टीवर आधारित दिल दोस्ती दोबारा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी आता जागो मोहन प्यारे ही नवी मालिका सुरु होतेय.

Updated: Aug 4, 2017, 02:57 PM IST
'दिल दोस्ती दोबारा' घेणार प्रेक्षकांचा निरोप title=

मुंबई : सहा मित्रांच्या गोष्टीवर आधारित दिल दोस्ती दोबारा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी आता जागो मोहन प्यारे ही नवी मालिका सुरु होतेय.

दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका हिट ठरल्यानंतर या सीरीजमधील दुसरी मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. मात्र पहिल्या मालिकेइतका प्रतिसाद या मालिकेला मिळू शकला नाही. 

या मालिकेत सखी गोखलेने परी, स्वानंदी टिकेकरने मुक्ता, पूजा ठोंबरेने आनंदी, सुव्रत जोशीने गौरव, अमेय वाघने साहिल आणि पुष्कराज चिरपुरटकरने पप्या राणेची भूमिका साकारलीये. अद्वैत दादरकरने याचे दिग्दर्शन केले संतोष काणेकर यांनी निर्मिती केलीये.