लग्नाच्या 4 वर्षांनंतर Bharti Singh कडून सासू- सासऱ्यांच्या वागणूकीबाबत खुलासा

लग्नासाठी येऊन असे गिफ्ट कसे देऊ शकते. 

Updated: Jan 19, 2022, 08:36 PM IST
 लग्नाच्या 4 वर्षांनंतर Bharti Singh कडून सासू- सासऱ्यांच्या वागणूकीबाबत खुलासा title=

मुंबई : भारती सिंग ही भारतातील सुप्रसिद्ध कॉमेडियन आहे, ती स्टेजवर येताच आपोआपच अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येते. कॉमेडियन तोच असू शकतो जो इतरांसमोर स्वतःवर देखील जोक मारुन हसायला शिकतो आणि भारती यात पारंगत आहे, तिला विनोद कसा करायचा हे माहित आहे.

आता आनंदाची बातमी अशी आहे की भारती लवकरच आई देखील होणार आहे. एप्रिलमध्ये ती मुलाला जन्म देणार आहे, त्यामुळे तिचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी नुकतीच भारती सिंग एका मुलाखतीत दिसली. साहजिकच खूप धमाल उडाली होती, पण भारती सिंगनेही आतापर्यंत लपवलेले रहस्य उघड केले आहे.

या मुलाखतीत भारती सिंगने तिच्या लग्नाबद्दल खूप काही सांगितले. तिचे सासूशी नाते कसे आहे, तसेच लग्नात सर्वात जास्त आणि कमी शगुन कोणी दिले. या मुलाखतीत भारती सिंगने अनेक गोष्टींची पोलखोल केली.

जेव्हा भारतीला प्रश्न विचारण्यात आला की ती पंजाबी कुटुंबातील आहे आणि हर्ष गुजराती कुटुंबातील आहे, तर कधी सासू-सासऱ्यांसोबत, तू-तू मैं-मैं झाली आहे का? यावर भारती सिंगने तिच्याकडून नेहमीच अपेक्षित प्रतिक्रिया दिली. भारती सिंह म्हणाली की, आता मीही त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे, त्यामुळे तू तू मैं मैंचा प्रश्नच येत नाही.

त्याचवेळी, हा मजेशीर प्रश्नही याच मुलाखतीत भारती सिंगला विचारण्यात आला. शेवटी, तिच्या लग्नात सर्वात जास्त आणि सर्वात कमी शगुन कोणी दिले? याला उत्तर देताना भारती सिंह म्हणाली की, तिला शगुनबद्दल माहिती नाही पण कोणीतरी तिला 6 आईस्क्रीम बाऊलचा सेट दिला होता.

जे पाहून तिला आश्चर्य वाटले की कोणी गोव्यात लग्नासाठी येऊन असे गिफ्ट कसे देऊ शकते. भारती सिंग लवकरच हुनरबाज शो होस्ट करताना दिसणार आहे. भारतात पहिल्यांदाच गर्भवती महिला अँकरिंग करणार आहे.