रणवीर-अनुष्काच्या ब्रेकअपचं कारण ठरली 'ही' अभिनेत्री...नक्की काय झालं 'त्या' दिवशी

अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग एकमेकांना डेट करत होते मात्र 'या' अभिनेत्रीमुळे ही लव्हस्टोरी पूर्ण होऊ शकली नाही.

Updated: May 6, 2022, 01:40 PM IST
रणवीर-अनुष्काच्या ब्रेकअपचं कारण ठरली 'ही' अभिनेत्री...नक्की काय झालं 'त्या' दिवशी title=

मुंबईः बॉलीवूडमधील अनेक लव्हस्टोरीज पूर्ण होऊ शकल्या नाहीत पण त्यांच्या गॉसिप्स खूप झाल्या. अशीच एक जोडी आहे अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगची.दोघांनी पहिल्यांदा 'बँड बाजा बारात' चित्रपटात एकत्र काम केलं. रणवीर सिंगचा हा पहिलाच डेब्यू चित्रपट होता तर अनुष्काचा हा दुसरा चित्रपट होता.

या दोघांच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि हा चित्रपटही हिट झाला. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री  आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री खूप चांगली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातही दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. काही काळ दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण नंतर 2011 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांच्या नात्यात दुरावा आला.

एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान रणवीरने सोनाक्षी सिन्हासोबत एक अभिनय केला, ज्यामुळे अनुष्का त्याच्यावर चिडली. दोघांचं सर्वांसमोर भांडण झालं आणि संपूर्ण कार्यक्रमात एकमेकांशी बोलले नाहीत. त्यानंतर दोघे कायमचे वेगळे झाले.

त्यावेळी अनुष्काला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळत होते तर दुसरीकडे रणवीर इंडस्ट्रीत स्थान निर्माण करत होता. या सर्व गोष्टींमुळे अखेर त्यांचे नाते तुटले.

एका मुलाखतीत रणवीर अनुष्कासोबतच्या ब्रेकअपवर म्हणाला होता की, मला तिची खूप आठवण येते. ती खूप प्रेमळ गोड आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. जेव्हा मी अनुष्काबद्दल नकारात्मक लेख वाचतो तेव्हा मला राग येतो, परंतु माझ्यावर लिहिलेल्या नकारात्मक लेखांचा मला इतका राग येत नाही. रणवीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनुष्काने विराट कोहलीसोबत तर रणवीरने दीपिका पदुकोणसोबत लग्न केले.