रणबीरने धोका दिल्यानंतर कशी सुरु झाली विकी-कतरिनाची प्रेम कहाणी?

दोघांचे नाते खूप काळ टिकले आणि बरेच दिवस ते लिव्ह-इनमध्ये होते,

Updated: Nov 19, 2021, 02:48 PM IST
रणबीरने धोका दिल्यानंतर कशी सुरु झाली विकी-कतरिनाची प्रेम कहाणी? title=

मुंबई : बॉलिवूडची कमली म्हणजेच कतरिना कैफ आणि हँडसम हंक विकी कौशल यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना आणि विकी डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत, या प्रकरणी या जोडप्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी बातम्यांनी जोर धरला आहे.

लग्न कुठे होणार ते कपड्यांपर्यंत सगळं फायनल झालं आहे. अशा परिस्थितीत या दोघांची प्रेमकहाणी कधी यशस्वी झाली याबाबत जाणून घेऊया.

रणबीर आणि कतरिनाची प्रेमकहाणी

चॉकलेट हिरो रणबीर कपूर आणि कॅटच्या प्रेमकथेनेही बरीच चर्चा रंगवली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही त्यांच्या 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटाच्या कथेदरम्यान 

एकमेकांच्या जवळ आले

दोघांचे नाते खूप काळ टिकले आणि बरेच दिवस ते लिव्ह-इनमध्ये होते, सर्वांना वाटत होते की ही जोडी लग्न करेल पण तसे झाले नाही.  रणबीर अनेकदा कतरिनासोबतच्या लग्नाची चर्चा पुढे ढकलत असे. त्यामुळे रणबीर आणि कतरिना यांच्यात मतभेद वाढू लागले. 

रणबीर कपूरचे कुटुंब विशेषतः नीतू कपूर कतरिनाला आपली सून बनवण्याच्या बाजूने नव्हते. अॅक्टींग क्लासमध्ये कतरिना विकीची क्रश बनली. आणि तो स्वत:ला कतरिनासोबत चित्रपटात काम करताना पाहत होता. ही इच्छा विकी कौशलने अनेक ठिकाणी व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर कॅटही विकीच्या अभिनयाचे कौतुक करताना थकत नाही. अॅक्टिंग क्लास दरम्यान, तिला एक टास्क देण्यात आला होता जो तिला एक मुलगी म्हणून कॅमेरा मानून पार पाडायचा होता.

मग विकी कतरिना कैफचा विचार करून कॅमेऱ्यावर डान्स करायचा, तोही कतरिना कैफच्या 'तेरी ओर' या हिट गाण्यावर.

कतरिनाचा हात सर्वांसमोर मागितला

त्यानंतर एका अवॉर्ड शोमध्ये दोघेही समोरासमोर आले होते. जिथे मंचावर विकीने कतरिनाला थेट लग्नासाठी प्रपोज केले. हे सर्व मजामस्ती होत असले तरी ते खरेच होते.

यानंतर दोघेही कॅमेऱ्याच्या नजरेपासून लपून एकमेकांना डेट करू लागले आणि विकीची कार कतरिनाच्या घराबाहेर तासंतास उभी राहिली, त्यांची जागा कतरिनाच्या घरी दिसू लागली, त्यामुळे अफवांनी आणखीनंच जोर धरला.