टी20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप सामन्यांनंतर टीम इंडियातून शुभमन गिल आणि आवेश खान या दोघांना रिलीज केलं जाऊ शकतं. एक रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार शुभमन गिल आणि आवेश खान टीमसोबत फ्लोरिडात दाखल झाले आहे. या ठिकाणी टीम इंडिया ग्रुपमधला आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर गिल आणि आवेश खानला भारतात परत पाठवलं जाईल. तर रिंकू सिंग आणि खलील अहमद राखीव खेळाडू म्हणून टीमबरोबरच राहातील.

पंधरा खेळाडूंच्या संघात सहभागी असलेला यशस्वी जयस्वालला अद्यार एकही सामना खेळवण्यात आलेला नाही. कॅनडाविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळू शकते.

टीम इंडियाने ग्रुपमध्ये सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये जागा मिळवली आहे. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला.

सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा 24 जुनला ऑस्ट्रेलयाशी मुकाबला होणार आहे. तर त्याआधी अफगाणिस्तानबरोबर टीम इंडिया दोन हात करेल.

सुपर- 8 मध्ये भारतीय संघ 20 जून, 22 जून आणि 24 जूनला आपले सामने खेळेल. हे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story