इंदोरम्ध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानला 6 विकेटने धुळ चारली.

या विजयाबरोबरच भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका टीम इंडियाने 2-0 अशी जिंकली.

मालिका विजयानंतर टीम इंडियातले तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी उज्जैनच्या महाकालेश्ववर मंदिराला भेट दिली.

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भारतीय खेळाडूंनी महादेवाचं दर्शन घेतलं. तसंच भस्म आरतीतही सहभाग घेतला. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने तुफान फटकेबाजी करत टीम इंडियाला शानदार मालिका विजय मिळवून दिला.

यशस्वी जयस्वालने 5 चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी करत 68 धावा केल्या. तर शिवमने अवघ्या 32 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्यने 4 षटकार लगावले.

भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानचा तिसरा टी20 सामना 17 जानेवारीला बंगळुरुच्या के एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story