टी20 वर्ल्ड कप विजयानंतर बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित, विराट आणि बुमरहा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीत.

श्रीलंकेचा क्रिकेट संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकादरम्यान टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

विराट-रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. पण जसप्रीत बुमराह देखील श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळण्याबाबत साशंकता आहे.

त्यामुळे रोहित, विराट आणि बुमराह आता थेट सप्टेंबरमध्ये खेळताना दिसणार आहेत. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

टीम इंडियाच्या वेळापत्रकात यावर्षी जास्त भर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेवर देण्यात आला आहे. टीम इंडिया एकामामोमाग एक पाच मालिका खेळणार आहे.

पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार आहे. यासाठी बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेवर जास्त भर दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story