'या' 5 लोकांपासून दूर राहिलात तर खूप प्रगती कराल! चाणक्यचा हा सल्ला तुमच्या आयुष्याला देईल कलाटणी

महान विचारवंतांपैकी

आचार्य चाणक्य यांना सर्वात महान विचारवंतांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याकडे आजही एक आदर्श मार्गदर्शक म्हणूनही पाहिलं जातं.

अनेक विषयांचं ज्ञान

चाणक्य यांना अर्थशास्त्रापासून ते समाजशास्त्रपार्यंत अनेक विषयांचं ज्ञान होतं.

आजही त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिलं जातं

चाणक्य यांनी रचलेल्या अनेक नीति आजही आवर्जून फॉलो केल्या जातात. त्यांच्या या नीति आजही अनेकजण मार्गदर्शनासाठी वापरतात.

या पाच व्यक्तींपासून दूर रहावं

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार यशस्वी होण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे हे जाणून घेऊयात...

पहिला प्रकार

आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तींबरोबर मैत्री करु नये असं चाणक्य सांगतात. अशा लोकांपासून दूर राहण्याचा ते सल्ला देतात.

दुसरा प्रकार

वाईट संगत असलेल्या लोकांपासून दूर रहावं. असे लोक आपल्या यशामध्ये अडथळा ठरु शकतात, असं चाणक्य म्हणतात.

तिसरा प्रकार

मूर्ख लोकांपासून दूर राहिलेलं चांगलं. अशा लोकांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.

चौथा प्रकार

सतत नकारात्मक गोष्टी करणाऱ्यांपासून चार हात दूर राहणं फायद्याचं ठरतं, असं चाणक्य म्हणतात. असे लोक स्वत: प्रगती करत नाही आणि इतरांनाही करु देत नाहीत.

पाचवा प्रकार

कठीण काळात तुमची साथ सोडून जाणाऱ्यांपासून दूर राहणं अधिक हिताचं ठरतं, असं चाणक्यनीति सांगते.

VIEW ALL

Read Next Story