पतीला कंगाल करते पत्नीची 'ही' सवय

पती पत्नी एकमेकांना पूरक असतात. त्यांनी एखादी चूक केली तरी त्याचा परिणाम एकमेकांवर होत असतो.

वास्तुशास्त्रानुसार, पत्नीने काही गोष्टी करु नयेत. अन्यथा त्याचा वाईट परिणाम नवऱ्यावर होतो.

पत्नीने उशीरापर्यंत झोपू नये. यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरात गरिबी येते.

पत्नीने कधीही आंघोळ न करता जेवण बनवू नये, अन्यथा अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो.

संध्याकाळच्या वेळेस पत्नी किंवा परिवाराच्या कोणत्याच सदस्याने झोपू नये.

पती-पत्नीने छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडू नये. घरात कलह निर्माण झाल्यास लक्ष्मी वास करत नाही.

घरात कधी घाण ठेवू नका. रात्री देखील उष्ट खरकटी ताट तशीच ठेवून झोपू नका. अन्यथा आर्थिक नुकसान होईल.

या गोष्टी करणे टाळाव्यात अन्यथा पती कंगाल होऊ शकतो, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे.

या चुका केल्यास घरात पैसे टिकत नाहीत. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story