कॅप्टन Rohit Sharma चा मोठा निर्णय, 'या' दोन खेळाडूंना मायदेशी पाठवणार

सुपर 8 मध्ये एन्ट्री

टीम इंडियाने साखळी फेरीतील दमदार कामगिरीनंतर आता सुपर 8 मध्ये एन्ट्री केली आहे. साखळी फेरीत एक सामना अद्याप बाकी आहे.

वेस्ट इंडिजला रवाना

साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला आगामी सामन्यांसाठी रवाना होईल. अशातच मोठी माहिती समोर आलीये.

राखीव खेळाडू

कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर दोन राखीव खेळाडूंना मायदेशी जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आलीये.

शुभमन आणि आवेश

कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर युवा स्टार शुभमन गिल आणि आवेश खान यांना भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतलाय.

रिंकू आणि खलील

तर रिंकू सिंग आणि खलील अहमद यांना संघासोबत वेस्ट इंडिजला जावं लागणार आहे. टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतलाय.

बाकावरचं वजन

साखळी सामन्यानंतर शुभमन आणि आवेशला रिलीज करण्याचा प्लॅन नव्हता. परंतू सध्याचं बाकावरचं वजन पाहता, हा निर्णय घेण्यात आलाय.

17 खेळाडू

दरम्यान, टीम इंडिया आता 17 खेळाडूंसोबत आगामी वर्ल्ड कप विजयाची वाटचाल पूर्ण करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story