भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पण या मालिकेत युवा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशनला संधी देण्यात आली नाही


दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ईशान किशनने वैयक्तिक कारण देत माघार घेतली. पण त्यानंतर तो कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर दिसला.


रणजी ट्रॉफी स्पर्धेतही ईशान किशन खेळला नाही. बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत ईशान किशन शेवटचा खेळला होता. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही.


ईशान किशनच्या वर्तणूकीवर बीसीसीआय नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर बसावं लागलंय.


आयपीएल 2024 मध्ये ईशान किशन खेळणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्यानंतर होणाऱ्या टी20 विश्वचषकात त्याला जागा मिळणार की नाही हे अनिश्चित आहे.


ईशान किशनला आता पुन्हा टीम इंडियात जागा मिळणार का याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story