Ramayana Facts:सीतेला का स्पर्शही करु शकला नाही रावण?

रावण सीतेला स्पर्शही करु शकला नाही, असे आपण अनेक कथांमध्ये ऐकले असेल. पण यामागचे कारण फार कमी जणांना माहिती असेल.

उत्तरकांडचा अध्याय 26 आणि श्लोक 39 मध्ये रावणाला देण्यात आलेल्या श्रापाचा उल्लेख करण्यात आलाय.

वाल्मिकी रामायणात उत्तरकांडमध्ये याबद्दल तुम्हाला श्रापाबद्दल वाचायला मिळेल.

कोणत्याही परस्त्रीला रावण स्पर्श करु शकत नाही, असा रावणाला श्राप होता. पौराणिक कथेत असे सांगण्यात आलंय.

पौराणिक कथेनुसार, सीता कैदेत असून देखील रावण तिला स्पर्शही करु शकला नाही.

रावणाने सीता मातेला लंकेतील अशोक वाटीकेत कैद केले.

रामायणानुसार, वनवासादरम्यान रावणाने कपटाने सीतेचे हरण केले.

भगवान राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षे वनवासात होते.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story