भारतातील 'या' राज्यातील लोकं सर्वात आनंदी

हॅपीनेस इंडेक्स त्या राज्यातील साक्षरतेचं प्रमाण, सामाजिक प्रकरणं, धार्मिक मुद्दे आणि महिला-पुरुष समानता या आधारावर ठरवला जातो.

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत मिझोरम या राज्यातील नागरिक जास्त आनंदी आहेत.

मिझोरममध्ये साक्षरतेचा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मिझोरमनंतर केरळात सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आहे.

मिझोरमध्ये सामाजिक प्रकरणात खूप समजुतदारपणा पाहायला मिळतो. इथली लोकं गुण्या गोविदांने नांदतात.

देशात काही राज्यात धार्मिक मुद्द्यावर दोन गट पडले असताना मिझोरममध्ये मात्र लोकांमध्ये धार्मिक मुद्यावर कोणताही वाद नाही

इतकंच नाही तर मिझोरममध्ये महिला-पुरुष असा भेदभाव नाही. इथे पुरुषां इतकाचा महिला्ंना मान सन्मान दिला जातो.

साक्षरता प्रमाण जास्त असल्याने इथली लोकं जागरुक आणि सतर्क असतात. मिझोरममधलं गुन्हेगारीचं प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत कमी नोंदवलं गेलंय.

VIEW ALL

Read Next Story