चाणक्य नितीः पतीने बायकोजवळ 'या' 4 गोष्टी कधीच बोलू नये!

पती-पत्नीच्या नात्यात विश्वास महत्त्वाचा असता, खोट बोलण्याने नात्यात दुरावा निर्माण होतो. मात्र लग्न टिकवण्यासाठी काही गोष्टींची जबाबदारी पती-पत्नी दोघांनाही घ्यावी लागते.

नातं टिकवण्यासाठी पती-पत्नी यांच्यातील काही गोष्टी गुप्त ठेवणेच हिताचे ठरते. आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार काही गोष्टी पतीने चुकूनही पतीसोबत शेअर करुन नये. नाहीतर घरात क्लेश निर्माण होतात.

अपमानाची गोष्ट

कोणतीही महिला आपल्या पतीचा अपमान कधीच सहन करु शकत नाही. मनात लगेच सूडाची आणि रागाची भावना निर्माण होते. म्हणून शांतता राखण्यासाठी रुषाने आपल्या पत्नीला त्याच्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये.

कमाईचा खरा आकडा

चाणक्य नितीनुसार, पत्नी जर समजुतदार नसेल तर कमी पगार असेलेल्या पतीचा सतत अपमान करते. आणि जरी तिला पतीचा पगार जास्त असेल ही माहिती असेल तर ती विनाकारण खर्च करते.

दान दिलेली रक्कम

शास्त्रानुसार, आपण दान केलेली रक्कम कोणालाही कळता कामा नये. तसंच, जर तुमची पत्नी कंजूस किंवा लालची असेल तर तुम्ही दिलेल्या दानाबद्दल कधीच सांगू नका. त्यामुळं घरात वाद होण्याची शक्यता असतात.

हळवी बाजू

पत्नीसमोर कधीच हळवी बाजू उलगडू नका. कारण महिला अजाणतेपणी याची माहिती दुसऱ्यांना देतात. काही दुसरे याचा फायदा घेऊन तुमचं नुकसान करु शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story