फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाताय? मग वेळीच सावध व्हा!

फळांवर मीठ, मसाले टाकण्याची सवय

फळांवर मीठ किंवा साखर शिंपडल्यानंतर फळांना पाणी सुटते. मीठ आणि चाट मसाल्यामध्ये आढळणारे सोडियम आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.

किडनीवरही वाईट परिणाम

सोडियम मीठ किंवा मसाल्यांमध्ये आढळते. या सोडियममुळे आपल्या शरीरातील पाणी तर वाढतेच पण किडनीवरही वाईट परिणाम होतो.

पोषणतत्व मिळणार नाही

कापलेल्या फळांवर मीठ किंवा कोणताही मसाला टाकताच फळांमधील आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात आणि फळे पूर्वीसारखी निरोगी राहत नाहीत.

पायावर वाढते सूज

मिठासह फळे खायला आवडत असल्यास शरीरात जळजळ होऊ शकते. त्यामुळे शरीर फुगलेले दिसते. कधीकधी या समस्येमुळे हात-पायांवर सूजही येते.

फळांवर साखर टाकून खाण्याचे दुष्परिणाम

फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. फळांमध्ये ग्लुकोज असते. यामुळे फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात.

फळं खाण्याची योग्य पद्धत

जेव्हा जेवणासाह फळांचेही सेवन करतो तेव्हा कार्ब्स आणि कॅलरीज आणखीन वाढतात. अशा परिस्थितीत जेवणातील कार्ब्सचे प्रमाम कमी करून फळं खाऊ शकतो. अन्यथा जेवण आणि फळं एकत्र खाऊ नयेत.

VIEW ALL

Read Next Story