मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांना ओळखले जाते.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेद्वारे ते घराघरात पोहोचले.

या मालिकेत एकत्रच काम करताना त्यांची घट्ट मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सखी गोखले आणि सुव्रत जोशीच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.

यात सखी आणि सुव्रतची पहिली भेट, सेटवरील गप्पा, पहिला सेल्फी आणि लग्नानंतर एकत्र घालवलेल्या सुट्ट्या असे अनेक फोटो पाहायला मिळत आहे.

या फोटोंना कॅप्शन देताना तिने "वैवाहिक साहस! लग्नाला 5 वर्ष पूर्ण" असे म्हटले आहे.

सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांनी अमर फोटो स्टुडिओ नावाच्या नाटकात एकत्र काम केलं.

त्या दोघांनी 11 एप्रिल 2019 रोजी लग्नगाठ बांधली.

लॉकडाउनदरम्यान सखी आणि सुव्रत ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत एकत्र झळकले होते.

VIEW ALL

Read Next Story