अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचं लग्न बॉलिवूडमधलं एक संस्मरणीय घटना होती. त्यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या प्रेमाची सुरुवात 'उमराव जान' या चित्रपटादरम्यान झाली. त्याच्या आधीपासूनच अभिषेकला ऐश्वर्या आवडत होती.

अभिषेक आणि ऐश्वर्याची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली. ज्यूनिअर बच्चन तिथे एका चित्रपटाच्या रेकीसाठी गेला होता.

तर ऐश्वर्या बॉबी देओलबरोबर आपल्या बॉलिवूड डेब्यू 'और प्यार हो गया' चित्रपटाच्या चित्रीकरमासाठी स्वित्झर्लंडमध्ये आली होती.

उमराव जान, गुरु आणि धूम-2 चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं प्रेम फुललं. गुरुच्या प्रिमिअर दरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी विचारंल आणि तीने होकार दिला.

20 एप्रिल 2007 ला अभिषेक आणि ऐश्वार्याचं धुमधडाक्यात लग्न झालं. लग्नात अमिताभ बच्चन यांनी व्हाईट शेरवानी परिधान केली होती.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं 16 वर्षांचं लग्न मोडणार अशी चर्चा आहे. याचं मुख्य कारण म्हणजे प्रॉपर्टीचं वाटप असल्याचंही बोललं जातंय पण ही एक केवळ अफवा आहे.

VIEW ALL

Read Next Story