अभिषेकनंतर आता ऐश्वर्याच्या 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चेला उधाण


गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अशातच ऐश्वर्याचा त्या कृतीमुळे या चर्चेला उधाण आलंय.


आर्चीजच्या स्क्रीनिंगसाठी संपूर्ण बच्चन कुटुंबा एकत्र आलं होतं. यावेळी ऐश्वर्या रायदेखील या सोहळ्याला उपस्थित होती.


या स्क्रीनिंगच्या वेळी सगळ्यांच्या नजरा ऐश्वर्या आणि अभिषेकवर होत्या. नेहमी दिसणारी बॉन्डिंग यावेळी दिसली नाही, असं अनेकांना वाटतं.


यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या ऐश्वर्या रायच्या लग्नाच्या अंगठीवर, कारण तिच्या बोटातील लग्नाची अंगठी गायब होती.


काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनच्या बोटातील लग्नाची अंगठी गायब झाल्याचा फोटो समोर आला होता. आता ऐश्वर्या रायच्याही बोटातील अंगठी गायब झाली आहे.


त्यामुळे या दोघांमध्ये काही आलबेल नाही असं बोलं जातं आहे. शिवाय ऐश्वर्याचा या कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story