टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना 5 जूनला खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया दोन हात करणार आहे.

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीवर सर्वांचा नजरा असणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात कोहली खेळू शकला नव्हता.

टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीसंदर्भात टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंहने मोठी भविष्यवाणी केली आहे.

यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल, असं भाकित युवराज सिंगने वर्तवलं आहे.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या सध्याचा फॉर्म बघता टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहिल असं युवराजने म्हटलं आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताबरोबरच वेस्टइंडिज किंवा पाकिस्तानचा संघ खेळेल असं भाकितही युवराजने वर्तवलं आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात किंग कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने 25 डावात 131.30 च्या स्ट्राईक रेटने 1141 धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story